अंधाराच्या काळोखात
मी काही पाहत आहे,
नात्यांच्या स्पष्टी करणात
मी मागे सरत आहे.
बा,कसे विसरतात माणसे
नवीन माणसे भेटली की,
क्षणात होतात परकी
हातांच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली.
हल्ली,प्रेम पाहण्याच्या
नादात कुठे पाहतो आपण प्रेम त्या आईवडिलांच त्यांनी केलेले उपकार,त्यांचा त्याग म्हणजे तो उपकार त्याग न फिटण्यासारखाच.मीच काय जगातील कोणताच अपत्य आपल्या आईवडिलांचा उपकार फेडू नाही शकत.
या जगाच्या कानाकोपऱ्यात बरेच फसवे माणसे मिळतील स्वतःचा स्वार्थ साधून घेतील आणि हे मी बऱ्याचदा अनुभवलय सुद्धा की स्वार्थ साधला की तू कोण आणि मी कोण आणि आजच्या घडीला हेच चाललय "जोडीतो माणसाशी माणूस तो म्हणजे ' स्वार्थ '"
आनंद आहे मला किही दुनिया, मैफील, मान,अपमान,खरे,वाईट,गुण,दुर्गुण फार लवकर कळायला लागले आणि इतरांनी केलेल्या अपमानाचा,हेटाळणीचा जेव्हा मनावर परिणाम होऊ लागला तेव्हा समजल की आपल्या बापाचं पण हृदय जड होत.'जड' म्हणजे पोलादासारख पाषणासारख न पाझरणार पण लेकरासाठी माय भीमेच्या पाण्यासारख.
सांगायचं एवढच की प्रेम शोधण्याच्या नादात आपण आपल खर प्रेम हरवत चाललोत.ज्या अर्थी आपल्याला वंशाचा दिवा ,वंशाची पणती म्हतल आहे.त्याअर्थी शेवटी त्यांना चटकेच देणार असाल तर त्याला काही अर्थ आहे का?हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे आणि तो प्रतेकाला पडावा एवढीच विठूरायांकड प्रार्थना.
खूप दिवसांनी कविता लिहायला काढली होती,पण तीच कधी लेखात रूपांतर झालं कळलच नाही,मनात खूप वादळे सुरू असली की असच होत.असो,कविता म्हटल की तिचा शेवट करावा लागतो.तर तोही करतोच मी;
अंधाराच्या काळोखात
मी पाहण' टाळणारच 'आहे,
नात्यांचं स्पष्टीकरण देणं
मी ' बंदच ' करणार आहे
~ Rahul Waghmode